🌿 वीस वर्षांनी भेटलेलं प्रेम… आणि उद्ध्वस्त झालेले दोन संसार ..... ❤️.. 💔
तिची आणि त्याची ओळख एका फेसबुक ग्रुपवरून पुन्हा झाली. दोघंही एकाच शाळेत शिकलेले… पण आयुष्याच्या धावपळीत संपर्क तुटला होता. अचानक जुने वर्गमित्र, मैत्रिणी पुन्हा एकत्र आले. कुणीतरी कल्पना मांडली — “आपण सगळे मिळून एक गेटटुगेदर करूया!”
सगळ्यांना आनंद झाला.....
ग्रुप तयार झाला… आठवणी जाग्या झाल्या… जुन्या फोटोवर हसू आलं… आणि शेवटी तो दिवस ठरला.
गेटटुगेदरचा....
त्या दिवशी सगळे जमले. हसणं, बोलणं, जुन्या आठवणी, शिक्षकांची नावे, शाळेतील किस्से… सगळं जसं पुन्हा जिवंत झालं होतं.
तीही होती.
तोही होता.
पण त्या भेटीत… काहीतरी वेगळंच घडलं.
थोड्या वेळाने तो तिला एकांतात घेऊन गेला.
थोडा थांबला… आणि म्हणाला —
“मी तुला शाळेत असताना खूप प्रेम करत होतो… पण कधीच सांगायची हिंमत झाली नाही.”
ती स्तब्ध झाली.....
क्षणभर भूतकाळ डोळ्यासमोरून सरकला...
तिने हळूच उत्तर दिलं नाही… पण मनात तिलाही जाणवलं — मलाही तेव्हा काहीतरी वाटायचं… पण मीही कधी बोलले नाही.
त्या दिवसानंतर दोघांचं रोज बोलणं सुरू झालं.
पहिले फक्त मेसेज… मग कॉल… मग तासन्तास गप्पा.
दोघांनाही आपल्या सध्याच्या संसारात समाधान नव्हतं.
ती म्हणायची — “माझा नवरा मला समजून घेत नाही…”
तो म्हणायचा — “माझी बायको कायम भांडते…”
हळूहळू जुनं अपूर्ण प्रेम पुन्हा जिवंत झालं.
आणि मग एक दिवस दोघांनी मोठा निर्णय घेतला.
“आपण एकत्र राहूया.”
त्यांनी आपापले संसार सोडले.
तिचं मूल आईपासून दूर झालं.
त्याच्या बायकोचं आयुष्य कोलमडलं.
नातलग, समाज, मित्र — सगळे विरोधात गेले.
पण दोघांना तेव्हा फक्त आपलं प्रेम दिसत होतं.
शेवटी त्यांनी लग्न केलं....
नवीन संसार थाटला.
फोटो काढले गेले, स्टेटस ठेवले गेले — “Finally together…”
पण जुन्या संसाराची राख कोण पाहत होतं?
तिच्या मुलाच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसलं?
त्याच्या बायकोच्या रात्रींचं रडणं कुणी ऐकलं?
प्रेम मिळालं…
पण चार आयुष्यं उद्ध्वस्त झाली.
आज ते दोघं एकत्र आहेत.
पण प्रश्न राहतो
हे खरंच प्रेम होतं का?
की फक्त जुन्या आठवणींचा मोह?
कधीकधी भूतकाळ परत येतो…
पण तो वर्तमान उध्वस्त करून.
शाळेचं प्रेम सुंदर असतं…
पण वीस वर्षांनी भेटलेलं प्रेम अनेकदा स्वार्थी ठरतं.
कारण ते स्वतःसाठी जगतं…
इतरांच्या भावना पायदळी तुडवतं.
म्हणूनच…
प्रत्येक गेटटुगेदर आनंद देतोच असं नाही.
कधी कधी तो जुन्या जखमा उघडतो.
कधी कधी पूर्ण संसार मोडतो.
प्रेम करायचं असेल तर पूर्ण जबाबदारीने करा…
कारण एका चुकीच्या निर्णयामुळे फक्त दोन नाही…
चार कुटुंबांचं भविष्य बदलू शकतं.
ह्यावर तुमचं मत काय?
असे गेटटुगेदर न घेतलेलेच बरे का, जर त्यातून संसार उद्ध्वस्त होत असतील?
मी तर म्हणेन अशा गेटटुगेदर ला पायदळी तुडवा आणि या नालायक लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करा.. तरच गेटटुगेदर हेच नामोनिशाण मीटेल.. नाहीतर दिवसेंदिवस असेच संसार उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत..✍️
#emitional #married #fbpost #photographychallenge #marathikataha #story #love

0 टिप्पणियाँ